शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शिक्षक बदल्या लांबल्या सांगली ‘वेटिंग’वर : अन्य जिल्ह्यांच्या याद्या मात्र प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:35 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे

सांगली : राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्याची यादी मंगळवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती, मात्र रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या शिक्षक बदल्यांच्या यादीकडे लक्ष लागले आहे.

राज्यात सुगम-दुर्गम भागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्या यावरून गेले वर्षभर चांगलेच वातावरण तापले होते. बदली प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी संघटनांनी मोर्चे काढले. परंतु यंदा प्रशासनाने कोणताही दबाव न घेता अखेर बदली प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत अशा दोन्ही टप्प्यांवर या बदल्या होताना दिसत आहेत. उन्हाळी सुटीत बदल्या होणार असल्याचे अटळ आहे. बदली प्रक्रिया ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याचदिवशी या आदेशाद्वारे शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. बदली झालेल्या शिक्षकांना दुसºयादिवशी लगेच बदली झालेल्या शाळेत तात्काळ रुजू व्हावे लागणार आहे.

जिल्ह्यांतर्गत बदल्यांची यादी शासनाच्या पोर्टलवरुन प्रसिद्ध केली जात आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्याची यादी मंगळवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे यादीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आंतरजिल्हा बदल्यांची यादी गत आठवड्यात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाणाºया शिक्षकांची संख्या २०८ आहे. इतर जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांची संख्या अवघी ६० आहे. जिल्ह्यातून बाहेर जाणाºया शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्या शिक्षकांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाकडे मागविला अभिप्रायजिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या दि. १५ मेपर्यंतच कराव्यात, असा शासनाचा आदेश आहे. पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बदल्या करता आल्या नाहीत. आचारसंहिता दोन दिवसात संपणार असून, दि. १५ मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या प्रशासकीय बदल्या केल्या तर चालतील का, याबद्दल शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अभिप्राय मागितला आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक